Ticker

6/Breaking/ticker-posts

"मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण" योजनेत महत्वपूर्ण बदल..!


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी दरमहा 1500 रुपये देणारी सुरू  केलेल्या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्यभरातील तलाठी आणि तहसील कार्यालयात एकच झुंबड उडाली.  तसेच या योजनेसाठी असलेला कमी कालावधी अन  काही त्रुटी लक्षात घेत तत्काळ काही बदल केले. 

"मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण" योजनेत अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. ते  खालीलप्रमाणे-


१.)  सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि. १ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत २ महिने ठेवण्यात येत असून ती दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

२.)  या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.

३.) सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.

४.) सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे.

५.) परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.

६.) रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.

७.) सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
या बदलांमुळे महिलांना दिलासा मिळाला आहे.  याप्रमाणे महिलांसाठी बदलांचा अभ्यास करून अर्ज दाखल करावेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या